नेहरू युवा केंद्रातर्फे आयोजित युवा उत्सव

 नेहरू युवा केंद्राचा जिल्हास्तरीय युवा उत्सव संपन्न



बुलडाणा, दि. 6 : नेहरू युवा केंद्रातर्फे आयोजित युवा उत्सव सोमवार, दि. 3 ऑक्टोबर रोजी जिल्हा क्रीडा संकुलामध्ये उत्साहात पार पडला. जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांनी द्विप प्रज्‍ज्वलन करून युवा उत्सवाचे उद्घाटन केले.  जिल्हास्तरीय युवा उत्सवात चित्रकला, कविता लेखन, छायाचित्र, भाषण, युवा संवाद व सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात आल्या.


कार्यक्रमाला खासदार प्रतापराव जाधव, जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, सामाजिक कार्यकर्ते ओमसिंग राजपूत उपस्थित होते.


खासदार प्रतापराव जाधव म्हणाले, युवकांतील सुप्त कलागुणांना व्यासपीठ देण्याचे कार्य युवा उत्सवाच्या माध्यमातून होते. देशाचे भवितव्य युवकांच्या हातात आहे. उद्याचा भारत युवकांच्या मनगटातील ताकतीवर घडणार आहे. युवकांना योग्य मार्गदर्शन व चांगले विचार देण्याची गरज  आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती म्हणाले, देशात सर्वाधिक संख्या युवकांची आहे. वर्ष 2040 पर्यंत भारत सर्वात जास्त युवाशक्ती असलेला देश राहणार आहे. या युवा शक्तीचा उपयोग राष्ट्र निर्माणासाठी व्हावा.


जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर यांच्या हस्ते समारोपीय कार्यक्रमात बक्षीस वितरण करण्यात आले. भाषण स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक विजया काळे, द्वितीय अंजली औतकर, तृतीय गायत्री इंगळे यांनी पटकविला. छायाचित्र स्पर्धेत प्रथम भूषण लोढे, द्वितीय विधी राठी, तृतीय साहिल बोराळे यांनी पटकविला. कविता लेखन स्पर्धेमध्ये प्रथम देवानंद निंबाळकर, द्वितीय वेदांत बोबडे, तृतीय गायत्री होगे यांनी पटकविला. चित्रकला, पोस्टर स्पर्धेमध्ये प्रथम गौरव परदेशी, द्वितीय नम्रता सोनोने, तृतीय वैष्णवी पायघन यांनी पटकविला. युवा संवादमध्ये आरती मोरे, पवन निंबाळकर, ऋतुजा वर्मा, मंगेश राजगुरु यांनी बक्षीस पटकविले.


 सांस्कृतिक कार्यक्रमात प्रथम गावंडे कॉलेज ऑफ फार्मसी, साखरखेर्डा, द्वितीय स्व. भास्करराव शिंगणे कला महाविद्यालय, साखरखेर्डा, तृतीय नृत्यांजली खामगांव यांनी पटकविला. रणजितसिंग राजपूत यांनी सूत्रसंचालन केले. लेखा व कार्यक्रम पर्यवेक्षक अजयसिंग राजपूत यांनी आभार मानले.


यावेळी जिल्हास्तरीय युवा मंडळ पुरस्कार कृषि समृध्दी मल्टीपर्पज संस्था, सुंदरखेड यांना देण्यात आला. तसेच शाहिरी लोककलामधील योगदानाबद्दल युवा शाहिर विक्रांतसिंग राजपूत, आपत्ती व्यवस्थापन कार्यातील योगदानाबद्दल प्रवीण साखरे, राष्ट्रीय तलवारबाजी  कास्य पदक विजेता पौरस देशमुख, विद्यापीठ प्रतिनिधी एनएसएस प्रकाश ब्राम्हणे यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमासाठी धनंजय चाफेकर, विलास सोनोने, अजय सपकाळ, नितीन शेळके, उमेश बावस्कर, राहूल पवनकार, विनायक खरात, सुमित वाकोडे, सुरज बोरसे, रिता वानखेडे, विशाल अंभोरे, शिवाजी हावरे, देवानंद नागरे, इरफान शहा, गणेश सुर्यवंशी, वैभव नालट, शितल मुंढे, शुभम वाठोरे, दिनेश चव्हाण, विजय जाधव यांनी पुढाकार घेतला.  


000000

Post a Comment

Previous Post Next Post