करुणा, प्रेम आणि सह-अस्तित्वाचा प्रेरणादायी उत्सव – मानव एकता दिवस

खामगांव, दि. २६ एप्रिल २०२६: हृदयात करुणा, प्रेम आणि एकात्मतेची दिव्य जाणीव जागृत झाली की, मनुष्य आपल्या संकुचित स्वार्थांच्या पलीकडे जाऊन संपूर्ण सृष्टीच्या कल्याणाचे प्रभावी माध्यम बनतो. परोपकार, करुणा आणि परमार्थ या उदात्त मूल्यांनी अधोरेखित झालेला हा दिवस उच्च मानवी मूल्यांची जाणीव अधोरेखित करणारा ठरला; ‘मानवाने मानवावर प्रेम करावे, एकमेकांचे आधार बनावे’ हा संदेश शब्दांच्या पलीकडे जाऊन जनमानसात ठळकपणे रुजला.


‘मानव एकता दिवस’ २४ एप्रिल रोजी युगप्रवर्तक बाबा गुरबचन सिंहजी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ, संत निरंकारी सत्संग भवन, घाटपुरी रोड, खामगांव येथे जिल्हा संयोजक तथा ज्ञानप्रचारक महात्मा संतोष   जी शेगोकार ह्यांच्या उपस्थितीत अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. याचबरोबर देशभरातील हजारो सत्संग केंद्रांवरही हा दिवस श्रद्धा व समर्पणभावाने यशस्वीरीत्या पार पडला. हे केवळ एक आयोजन नव्हे तर प्रेम, सद्भावना आणि निष्काम सेवेचे प्रभावी प्रतिबिंब म्हणून ते सर्वत्र उमटत राहणारच


युगप्रवर्तक बाबा गुरबचन सिंह जी यांच्या स्मृतीत साजरा होणारा हा दिवस वर्षभर चालणाऱ्या सेवा उपक्रमांचा प्रारंभबिंदू आहे. याअंतर्गत देशभरात सुमारे ७०५ ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित केली जाणार असून, करुणा आणि एकात्मतेची भावना अधिक दृढ करण्याचा संकल्प यामागे आहे.


विशेष म्हणजे, रक्तदानाची ही पावन परंपरा मागील चार दशकांपासून अखंडपणे सुरू आहे. आतापर्यंत ९,१७४ रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून सुमारे १५,००,२३० युनिट रक्त संकलित करण्यात आले असून, मानवसेवेप्रती निरंकारी मिशनची अटळ बांधिलकी यामुळे अधोरेखित होते.


युगप्रवर्तक बाबा गुरबचन सिंह जी यांनी सत्य, साधेपणा आणि सद्भावनेचा मार्ग दाखवत तरुणांना नशामुक्त जीवनाचा अवलंब करण्याचे आणि आपली ऊर्जा समाजसेवेसाठी वापरण्याचे आवाहन केले. बाबा हरदेव सिंह जी यांनी “रक्त नाड्यांतून वाहावे, नाल्यांतून नव्हे” हा संदेश देत सेवेला जीवनाचा अविभाज्य घटक बनवले. हाच सेवा-संदेश सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आजही प्रभावीपणे पुढे नेला जात आहे.

Post a Comment

أحدث أقدم