राजेंद्र बघे यांच्या मध्यस्थीने तरोडा कसबा टोलनाक्यावरील काम बंद आंदोलन स्थगित

कामगारांच्या वेतनवाढ, विमा व नियमित वेतनाच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा; कामगारांना दिलासा


खामगाव : तरोडा कसबा टोलनाक्याअंतर्गत कार्यरत मेंटेनन्स मजूर कामगारांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सुरू करण्यात आलेले काम बंद आंदोलन दि. २३ ऑगस्ट रोजी शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र बघे यांच्या यशस्वी मध्यस्थीने स्थगित करण्यात आले. बघे यांनी मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्टर राजेश हबीब यांच्याशी चर्चा करून कामगारांच्या मागण्यांबाबत सकारात्मक तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतला.

तरोडा कसबा टोलनाक्याअंतर्गत मेंटेनन्सचे काम करणाऱ्या मजूर कामगारांना वेतनवाढ देण्यात यावी, कामगारांचा विमा काढण्यात यावा तसेच वेतन दरमहा त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात यावे, अशा प्रमुख मागण्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आल्या होत्या. यासंदर्भात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी खामगाव तहसीलदारांना निवेदन देऊन काम बंद आंदोलन सुरू केले होते.

दरम्यान, आंदोलनाची दखल घेत शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र बघे यांनी मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्टर राजेश हबीब यांच्याशी संपर्क साधून कामगारांच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा केली. या चर्चेत कामगारांच्या प्रमुख मागण्या पूर्ण करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात आली. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सुरू करण्यात आलेले काम बंद आंदोलन स्थगित करण्यात आले.

यावेळी शिवसेनेच्या वतीने देवेश लोखंडकार, शिवसेना उपतालुकाप्रमुख गोपाल भिल, विभागप्रमुख चेतन शलकर, विभागप्रमुख आकाश माने, तसेच पोलीस विभागाच्या वतीने जाधव साहेब व कर्मचारी उपस्थित होते.

या आंदोलनाचे नेतृत्व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल पाटील यांनी केले. यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख योगेश घोंगे, अविनाश कोकाटे, भगवान भोपळे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व मेंटेनन्स कामगार देवानंद तायडे, गजानन तुळशीराम हिंगणे, रामेश्वर सुनीलसिंग पवार, संदीप देवीदास कोरडे, सुभाष भास्कर मोरे, कौतिकराव खंडारे, प्रकाश काटे, अंबादास कवळकार, सुरेश तेलगोटे, दीपक खंडारे, शंकर घोंगे, समाधान कवळकार, संदीप काळे, केशव भालटिळक, गजानन पेसोड, रोशन गुर्दे व शुभम गुर्दे उपस्थित होते.

कामगारांना योग्य वेतन, विमा संरक्षण आणि नियमित वेतन मिळावे, या प्रमुख मागण्यांसाठी संघटनेने आंदोलनाची भूमिका घेतली होती. राजेंद्र बघे यांच्या मध्यस्थीमुळे चर्चेतून सकारात्मक तोडगा निघाल्याने आंदोलन स्थगित झाले असून, त्यामुळे संबंधित कामगारांना दिलासा मिळाला आहे.


Post a Comment

أحدث أقدم